मुंबई : सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले अकोल्यामध्ये मीडियाशी बोलताना त्यांनी राहुल गांधींना खास सल्ला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकराने विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले,' राहुल गांधी कधी कधी दलितांच्या घरी जाऊन जेवतात. मात्र केवळ त्यांच्यासोबत जेवल्याने जातिवाद नाही असे म्हणता येत नाही. माझ्यामते त्यांनी दलित मुलीशी लग्न करायला हवे. गरज पडल्यास मी मुलगी शोधायला मदत करेन.'


मला राहुल गांधींचा अपमान करण्याचा उद्देश नाही. तर आंतरजातीय विवाहासाठी हे एक उत्तम उदाहरण ठरू शकते याकरिता मी हा प्रस्ताव मांडला आहे. 'मी स्वतः ब्राम्हण मुलीशी लग्न केले आहे. जातीची बंधनं तोडणं गरजेचे आहे. 


(राहुल गांधी) आता पप्पू नाही त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे ते उत्तम नेतृत्त्व करू शकतात.