नवी दिल्ली : लष्करप्रमुखांवर केलेली टीका चुकीची असल्याचं सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांचे कान उपटले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लष्करप्रमुखांवर राजकीय नेत्यांनी टीका करणं योग्य नसल्याचं राहुल गांधींनी नमूद केलंय. देशाचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत एखाद्या रस्त्यावरच्या गुंडासारखी विधानं करतात असा खळबळजनक आरोप काँग्रेस खासदार संदीप दीक्षित यांनी केलाय. लष्करप्रमुखांबाबत केलेल्या या वक्तव्यावरून वाद  उफाळून आल्यावर संदीप दीक्षित यांनी माफी मागितली आहे.


पाहा काय म्हणाले होते संदीप दीक्षित