नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औद्योगिक उपक्रमांना आळा घालण्यासह देशभर कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन औद्योगिक संघटनेने (सीआयआय) या औद्योगिक संघटनेने केले आहे. सीआयआयचे अध्यक्ष उदय कोटक यांनी कोरोना विषाणूच्या साथीच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे, कारण यावेळी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदय कोटक यांनी निवेदनात म्हटले आहे की, 'केंद्र आणि राज्य सरकारांकडून आपत्कालीन पायाभूत सुविधा आणि पुरवठा वाढविण्यासाठी काम केले जात आहे, परंतु त्यासाठी वेळ लागेल. या गंभीर टप्प्यावर, जेव्हा लोकांचे जीवन संकटात आहे, सीआयआय आर्थिक क्रियाकलाप मर्यादित करण्यासह मजबूत देशव्यापी पावले उचलण्याची मागणी करते.'


दररोज कोरोना संक्रमण होण्याचं प्रमाण वाढत आहेत. या दृष्टीने हॉस्पिटलचे बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजन आणि औषधांची गरज वाढत जाईल असे चेंबरने म्हटले आहे.


कोटक पुढे म्हणाले की, 'रुग्णांची मोठी गर्दी हाताळण्यासाठी हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन कामगार प्रयत्न करत आहेत, परंतु सध्याच्या वाढत्या संक्रमणामुळे प्रकरणे हाताळणे शक्य नाही. आम्हाला यावर भारत आणि परदेशातील तज्ञांच्या सल्ल्याची गरज आहे. संक्रमण साखळी तोडण्यासाठी आणि त्याची क्षमता वेगाने वाढविण्याची आवश्यकता आहे.'


सीआयआयने पायाभूत सुविधा आणि रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचार्‍यांचे रक्षण करण्यासाठी सशस्त्र सेना आणि केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती यासह सेवानिवृत्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी आणि राज्यांना पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करावा असे उपाय सुचविले आहेत.


सीआयआयने सूचित केले की जीएनएम / बीएससी प्रशिक्षण पूर्ण केलेले नर्सिंग आणि वैद्यकीय विद्यार्थी आणि जे परीक्षेची प्रतीक्षा करीत आहेत, त्यांची गही मदत घ्यावी. कोविड आयसीयूत एका वर्षाच्या कामानंतर हे भविष्यात क्रेडिट म्हणून मोजले जाऊ शकते. सीआयआयने शहरी आणि ग्रामीण भागात आरटीपीसीआर टेस्ट दुपटीने वाढवण्याची मागणी केली आहे.