मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. स्पेन, इटली आणि अमेरिकेतील स्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होताना दिसतेय. स्पेनमध्ये कोरोनामुळे एका दिवसात ७०० जणांचा मृत्यू झालाय. भारतातही या भयावह आजारामुळे जनतेला घरातच राहण्याचा सल्ला दिला गेलाय. आतापर्यंत देशात कोरोनाचे ६०६ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १० जण मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या १२३ तर मुंबईत रुग्णांची संख्या पन्नाशीपार गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यामध्ये कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत. असे असतानाही दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत ४२ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.  


 मोदी सरकार १० कोटी लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचं समजतंय.  


यासाठी दीड लाख कोटींचं पॅकेज घोषित करणार असल्याचं सांगण्यात येतंय. सरकारने तूर्त या निर्णयाची अंतिम घोषण केलेली नाही. पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे.


टोलवसुली स्थगित 


केंद्रीय परिवहन विभागाने एक महत्वाचा निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार १४ एप्रिल पर्यंत टोलवसूली स्थगित करण्यात आली आहे. 


देशभरात कोरोनाचे सावट घोंघावत असताना केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय.


देशभरातील टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.


कोरोनामुळे अत्यावश्यक सेवांना अडसर निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितले आहे.