मुंबई : एअरटेल कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल यांनी अभिमान वाटावा असा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या एकूण संपत्तीतील १० टक्के इतकी रक्कम समाजकार्यासाठी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.


सात हजार कोटी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या या घोषणेचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. कारण ही रक्कम साधारण सात हजार कोटींच्या घरात जाते. 


दुर्बल घटकांपर्यत 


सुनील मित्तल यांनी घोषित केलेली रक्कम ही भारती फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू, दुर्बल, वंचित घटकांपर्यत पोहोचवली जाणार आहे. 


सत्य भारती विश्वविद्यापीठ


दरम्यान सुनील मित्तल यांनी २०२१ साली सत्य भारती विश्वविद्यापीठ स्थापन करण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली.


हे विद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा पुरस्कार करणारे हे विद्यापीठ असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.