नवी दिल्ली : मोबाईल नंबर आणि बॅंक खाते आधार कार्डाला जोडावे की नाही, यांवर घटनापीठ निर्णय घेणार आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत निवाडा दिल्यानंतर आता पुढल्या आठवड्यात घटनापीठाची स्थापना केली जाणार आहे.


बॅंक खाते आणि मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्याचा निर्णय योग्य असल्याचा दावा केंद्र सरकारनं केला होता. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी कोणताही निर्णय देऊ नये, अशी विनंती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला केली होती.