नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सायंकाळी दहशतवादी आणि भारतीय सैन्यात चकमक झाली आहे. या हल्ल्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर अचानक हल्ला केला. दहशतवाद्यांनी या गोळीबाराला प्रत्युत्तर देत केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. तर, इतर दोन-तीन दहशतवादी लपून बसलेल्या परिसराला सैन्याने घेरलं आहे.


केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे सध्या चार दिवसांच्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यापासून काही अंतरावरच हा हल्ला केला आहे.