प्रतापगड : उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील कैमा गावात बाईक आणि ट्रकच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाला. अपर पोलीस अधीक्षक बसंत लाल यांनी सांगितले की,  या अपघातात लालगंज येथील किलहनापुर गावातील अनुज (२२), अभय (२३) आणि नवरंग (२४) हे तिघे लग्नाच्या वरातीसाठी काळ रात्री बाईकवरून जात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र ट्रक आणि बाईकच्या धडकेत हे तिघेही गंभीर जखमी झाले. मात्र त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे नवरंगला मृत घोषित करण्यात आले. अन्य दोघांची स्थिती नाजूक असल्याने त्यांना इलाहाबादला हलवण्यात आले. 


परंतु, त्यादरम्यान अनुज आणि अभयचा देखील मृत्यू झाला. पोलिसांनी तीनही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.