लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा इशारा देत खळबळ उडवून दिली आहे. जर हिंदू धर्माचार्यांमध्ये सुधारणा झाली नाही, तर योग्य वेळी आपणही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच बौद्धधम्माचा स्वीकार करू, असे मायावती यांनी जाहीर केले आहे. आजमगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत मायावती म्हणाल्या की, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी, मी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ साली केली होती. हिंदू धर्मातील अस्पृश्यतेमुळे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. या घटनेनंतरही हिंदू धर्माचार्यांमध्ये सुधारणा झाली नाही. याच कारणामुळे येणाऱ्या काळात आपणही बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहोत.


देशात धर्माच्या नावावर भीतीचे वातावरण


त्या चुकीचं म्हणाल्या नाहीत.सर्व हिंदूंना जर तुम्ही बरोबरीचे स्थान देत नसाल तर त्यांचा सन्मान राखायचा त्यांना पूर्ण हक्क आहे. संघीय ब्राह्मणांनी ही भेदाभेद ठेवली आहे. अजूनही तुम्ही दलितांना ''ती लोकं'' अस बोलता तेव्हा मनातली जाल गेलेली नसते.माझी जात धर्मसत्तेशी निगडीत असली तरी त्या प्रकारे जातीच...


आज देशात धर्माच्या नावावर भीतीचे वातावरण पसरले असल्याचे मायावती म्हणाल्या. विशेषत: मुस्लिमांमध्ये भाजप आणि आरएसएसमुळे हे भीतीचे वातावरण अधिक वाढत आहे अशा शब्दांत मायावतींनी भाजपवर जोरदार प्रहार केले. भाजप हिंदुत्वाला आपला अजेंडा बनवत लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीला लागला आहे. हिंदूंना संभ्रमित करण्यासाठी राम मंदिराचा राग आळवला जात आहे, मात्र राम मंदिर निर्माण करण्याने किंवा देवाला काही अर्पण करण्याने आपला खिसाच रिकामा होणार आहे असे म्हणत त्यांनी भाजपच्या रणनितीवर सडकून टीका केली.


भांडवलदार धार्जिण्या योजना आणि जातीयवादी विचारधारा


जेव्हापासून भाजप सत्तेवर आला, तेव्हापासून देशात आरएसएसच्या भांडवदार धार्जिण्या योजना लागू करण्याबरोबरच भाजप लोकांवर जातीयवादी विचारधारा लादत असल्याचा आरोपही मायावती यांनी केला. भाजप आणि आरएसएसवर टीका करताना त्या पुढे म्हणाल्या की, भाजपच्या लोकांनी २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा केला. यामुळे आमच्या पक्षावर देखील परिणाम झाला. त्याकाळात काँग्रेसच्या जनताविरोधी धोरणांमुळे देशभर काँग्रेसविरुद्ध राग होता.