नवी दिल्ली : RLSP प्रमुख उपेंद्र कुशवाहा यांनी आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिलाय. न्यूज एजंसी ANI ने यासंदर्भातील वृत्त दिले. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेऊन आपला पक्ष एनडीए पासून वेगळा झाल्याचे जाहीर करणार आहेत. साडे तीन वाजता होणाऱ्या विपक्षांच्या महागठबंधनमध्ये ते सहभागी होणार का याबाबत अद्याप खुलासा झाला नाही.  उपेंद्र कुशवाहा आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. पाच राज्यांतून येणाऱ्या निवडणूक निकालाच्या आधी एनडीएनने आपल्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये सहभागी होण्यास उपेंद्र कुशवाहा यांनी विरोध दर्शवला.


जागा वाटपावरून नाराज  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 2019 ची लोकसभा निवडणूक तोंडावर असताना जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ते भाजापाशी बराच काळ नाराज होते. ते कधीही एनडीए सोडून महागठबंधनमध्ये सामिल होतील असे तर्क गेले काही दिवस लढवले जात होते.


काही दिवसांपुर्वी झालेल्या मोतिहारी पार्टीतील 3 दिवसांच्या संम्मेलनातनंतर आपण एनडीएचे काही दिवसांचेच पाहुणे असल्याचे संकेत दिले होते.


बिहारच्या नितीश सरकारवर ते सातत्याने हल्लाबोल करत राहिेले. 


कुशवाह यांना पाठिंबा 


 असं असलं तरीही उपेंद्र कुशवाह यांच्या पार्टीतील इतर आमदार, खासदारांचं यावरील मत वेगवेगळ आहे.


आरएलएसपीचे खासदार अरूण कुमार यांनी भाजपाचे समर्थन कायम ठेवणार असल्याचं म्हटलंय.


लोकसभा निवडणुकीत भाजपाच समर्थन कायम ठेवणार असल्याचे अरूण कुमार यांनी 'इंडियन एक्सप्रेस' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 


दोन आमदारांचं बंड ?


 दुसरीकडे आरएलएसपीचे आणखी एका खासदार रामकुमार शर्मा यांनी उपेंद्र कुशवाह यांच्या निर्णयाचं स्वागत केलं.


सीतामढीचे खासदार रामकुमार शर्मा यांनी आपण कुशवाह यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले. 


तर आरएलएसपीचे दोन आमदार लल्लन पासवान आणि सुधांशु शेखर बंड करण्याच्या तयारीत आहेत.


ते जेडीयूच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.