मुंबई : भाज्यांच्या दरात तुफान वाढ झाली असून जेवणातून आता टोमॅटो आणि बटाटा हद्दपार झाला आहे. कांद्यासोबत अनेक भाज्या ताटातून गायब होण्याच्या तयारीत आहेत. टोमॅटोचा दर देशात ८० ते १०० रुपये इतका आहे. तर कांदा आणि बटाट्याचा दर ४० ते ५० रुपये इतका आहे. परतीच्या पावसाने भाज्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. 


कोलकाता टोमॅटो १०० रुपये दर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकातामध्ये टोमॅटोचा दर १०० रुपये दर आहे. देशभरात अनेक ठिकाणी भाज्यांचा दर ६० ते ८० प्रति किलो असा आहे. कांदा आणि बटाट्यांचे दर देखील ५० रुपये प्रति किलो झाला आहे. दिल्लीत भाज्यांचे दर कडाडले आहेत. गाजीपुर भाजी मंडईत दर बदलले आहेत. टोमॅटोचा दर ६० रुपये किलो आहे. १३०० ते १४०० रुपये कॅरट मिळत आहे. 


भाज्यांचे दर 


- बटाट                 40


- कांदा             40-50


- टोमॅटो             60-70


- फ्लॉवर             100


- शिमला मिर्च     80


- पडवल            80


- फरसबी           80


- भेंडी            50-60


- दोडका           40


- हिरवी मिरची     120-140


- लसून           150-160


- कोबी        80