अजमेर : आपल्या देशात विवाहसोहळ्यांदरम्यान लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. या दिवशी कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून लोकं महिन्याभरा पूर्वीपासून लग्नाची तयारी करण्यासाठी सुरवात करतात. परंतु लग्नात ऐन वेळेला ही तयारी काही वेळा कमी पडते किंवा काही वेळा ती इतकी जास्त होते की, जे घडते त्याची कोणी कल्पना देखील करु शकणार नाही. तसाच हा प्रसंग असा काही असतो की, त्यावेळेला तो गंभीर असू शकतो, परंतू नंतर त्याबद्दल विचार करताना तुम्हाला हसू देखील येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानातल्या अजमेरमधील लग्नात असेच काहीसे नवरदेवा सोबत घडले आहे. हे गंभीर तर आहे, परंतु नंतर नवरदेवाला हा क्षण आणि हा दिवस आठवून हसू आवरता येणार नाही.


कारण या नवरदेवाच्या वरातीत लोकांनी आनंदाने फटाके वाजवायला सुरवात केली, परंतु त्या फटाक्यांच्या आवाजाला घाबरुन घोडी नवरदेवाला घेऊन सरळ 4 किलोमीटर पळत सुटली.


राजस्थानमधील विवाहसोहळ्यादरम्यान घडलेल्या या विचित्र, गंभीर आणि मजेदार घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ अजमेरमधील नसीराबादमधील आहे. जिथे रामपुरा गावाजवळ नवरदेवाची वरात काढली जात होती. परंतु फटाक्यांच्या आवाजाने घोडी घाबरली आणि नवरदेवाला घेऊन लोकांच्या गर्दीतून पळून गेली. नवरदेवाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती अशी काही पळत सुटली की, ती काही थांबली नाही.


या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली, कारण या घोडीने थेट नवऱ्यालाच पळवले होते. त्यानंतर वरातीला आलेल्या लोकांना त्यांना जे साधन मिळेल ते घेऊन ते या घोडीचा पाठलाग करु लागले. त्यानंतर सुमारे 4 कि.मी. पळाल्यानंतर अखेर या घोडीला थांबवण्यात लोकांना यश आलं आणि त्यांनी नवरदेवाला खाली उतरवले.



सुदैवाने या काळात कोणताही मोठा अपघात झाला नाही. तसेच या घटनेमुळे नवदेवाला सुद्धा दुखापत झाली नाही. परंतु यासर्व प्रकारामुळे नवरदेव खूप घाबरला ज्यामुळे त्याची मनस्थिती ठिक नव्हती. परंतु त्याने लग्नाचे संपूर्ण विधी पूर्ण केले.