रत्नागिरी : कोल्हापूर, सांगली येथील काही पर्यटक पावसाचा आनंद लुटण्यासाठी कोकणात आले होते. मात्र, राजापूर येथील सवतकडा धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी पोहोचले. मात्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथे अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने १३ पर्यटक पाण्यात अडकले. त्यांचा जीव धोक्यात असल्याचे पाहून काहीनी त्यांना वाचविले.