ठाणे : अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे उद्यानाची भिंत कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महालक्ष्मी नगर गॅस गोडाऊन परिसरातली ही घटना आहे. भिंत कोसळल्याने ५ ते ६ घरांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे.


या घटनेत भिंतीखाली दबून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे.