अहमनगर : अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीत झालेल्या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात २ शिवसैनिकांचा मृत्यू झाला असल्याचं, शिवसेनेचे माजी आमदार संजय राठोड यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हा हिंसाचार झाला, यात संजय कोतकर, वसंत ठुबे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ठार झालेल्या दोन्ही शिवसैनिकांना गोळ्या घातल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. ठार झालेल्या शिवसैनिकांच्या मृतदेह अजूनही घटनास्थळी आहेत. शहरात वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे, पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शहरातील दोन चौकात हाणामाऱ्या झाल्या, वाहनांची मोडतोड झाली. यानंतर उसळलेल्या हिंसाचारात २ जणांना गोळ्या घालण्यात आल्या, ते दोनही शिवसैनिक असल्याचं सांगण्यात येत आहे.