मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील ऐश्वर्या सावंत हिची इंग्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तिच्या या निवडीबाबत कौतुकाचा वर्षाव होत आहे. रत्नागिरीतून ऐश्वर्या लंडनकडे रवाना झाली. 


अत्यंत गरीबीवर मात करुन ऐश्वर्या हिने हे यश मिळवलेय. आर्थिक परिस्थितीमुळे रत्नागिरीच्या बाहेर जाण्याची कल्पनादेखील करु न शकणारी ऐश्वर्या आपल्या मेहनतीच्या जोरावर खो-खो या खेळाच्या माध्यमातून तिने ही भरारी घेतली आहे. देशभरातील अनेक खो -खोची मैदाने तिने गाजवली आहेत. आज ती इंग्लंडला रवाना झाली.