मुंबई : भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षात नाराज आहेत हे आता वेगळ सांगण्याची गरज नाही. विधानसभा निवडणूकीत त्यांना जाणिवपूर्वक बाजुला करण्यात आले याची खदखदही त्यांनी बोलून दाखवली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपच्या काही जागा घटल्या त्याला भाजपचे काही नेतेच जबाबदार आहेत. हेतूपुरस्पर मला, चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे आणि इतर काहीजणांना प्रचाराच्या दरम्यानबाहेर ठेवण्यात आल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. दरम्यान एकनाथ खडसे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत या दोघांमध्ये अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे कळते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना खासदार संजय राऊत यांना यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. एकनाथ खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात असतात असे सूचक विधान राऊत यांनी केले. विधानसभा निकालानंतर खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला. त्यामुळे ही शक्यता आणखी दाट झाली आहे. आम्ही जर या निवडणूक प्रचारात असतो तर २० ते २५ जागा वाढल्या असत्या असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आरोप करताना केला आहे. दरम्यान, त्यांनी राज्यात आलेल्या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकासआघाडी सरकारला शुभेच्छा दिल्या. त्यांनी स्थिर आणि चांगले सरकार द्यावे, असे सांगत शुभेच्छा दिल्या.



आम्हाला जाणीपूर्वक बाजूला करण्यात आले. काहीजणांना प्रचाराच्या दरम्यान बाहेर ठेवण्यात आले. त्याच्यामुळे निश्चितच त्याचा फटका पक्षाला बसला आहे. आम्हाला सोबत घेऊन चालले असते तर वीस पंचवीस जागांचा फरक निश्चितच पडला असता. हे आम्ही वेळोवेळी पक्षाला सांगितले. याबाबत जाब आम्ही वरिष्ठांना विचारलेला आहे, असे खडसे यांनी सांगितले. 


दरम्यान, अजित पवार यांच्यावरुन खडसे यांनी भाजपला टोला लगावला आहे. पार्टी वुईथ डिफरन्स, हे पक्षाचे धोरण होते. मात्र, अजित पवारांना घेवून तडा घेतला. त्याच्याबरोबर जाणे भाजपचे चुकीचे आहे. अजित पवार यांच्या विरोधात असलेले बैलगाडीवर पुरावे आम्ही रद्दीत विकलेले आहेत, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित करत भाजपला टोकले आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आमचे सरकार अल्पमतात आले, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा मंगळवारी संध्याकाळी राजीनामा दिला होता.