पुणे : शिवसेनेने २८८ जागांवर मुलाखती घेतल्याचे आपल्याला माहिती नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच पुन्हा यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका करत इशाराही दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीच सत्ता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तसेच महायुतीचे जागावाटप लवकरच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. माजी खासादार उदयनराजे भोसलेंच्या पक्षप्रवेशावरून टीका करणाऱ्या राष्ट्रवादीलाही मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावले. सिंचन गैरव्यवहाराची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचाही इशाराही त्यांनी दिला. 


सिंचन गैरव्यवहारावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. याबाबत कारवाई अंतिम टप्प्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी उदयनराजे यांच्या नेतृत्त्वात शिवस्वराज्य यात्रा काढण्यासाठी आग्रही होते. मात्र, आता त्यांना उदयनराजेंमध्ये दोष दिसत आहेत, हे म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट असल्यांचे म्हणत राष्ट्रवादीवर टीका केली.