मुंबई : राज्यात 24 तासांत 68 हजार 631 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 503 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 45 हजार 654 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून. प्रत्येकाने खबरदारी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर मुंबईत आज 8 हजार 479 नव्या कोरोना  रूग्णांची नोंद झाली आहे.  धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 53 जणांचा बळी गेला आहे. मुंबईत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरण चिंता वाढवणारं आहे.  



कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 1 हजार 475 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 16 हजार 310 आहे. तर एका दिवसांत 1 हजार 219 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज मिळालेला आहे. गेल्या 24 तासांत 5 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.