रायगड : कोरोनामुळे निर्बंध आणि नियम कठोर करण्यात आले होते. मात्र संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. रायगडकरासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर मास्क विसरला किंवा मास्कशिवाय फिरलात तर आता घाबरू नका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही विनामास्क जिल्ह्यात फिरत असाल तर आता तुमच्यावर पोलीस कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाहीत. विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्‍मक कारवाई नका असे आदेशच जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पोलिसांना दिले आहेत. 


नव्या आदेशानुसार सुरक्षा शाखेने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी यांना पत्र जारी केले आहे. 


कोरोनाची लाट ओसरल्‍यानंतर जिल्‍हा निर्बंधमुक्‍त झाला मात्र तोंडावरचा मास्‍क हटला नव्‍हता. मात्र आता रायगडकरांसह पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे. आता मास्क विसरलात किंवा नसेल तरी पोलिसांची भीती बाळगण्याची गरज नाही.