नागपूर : इंधन दरवाढीमुळे संपूर्ण देश त्रस्त असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यावर काही उपाय सुचविले आहेत. इथेनॉल, मिथेनॉल हे पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात, असं गडकरींनी सुचवलंय. 


ऊसाचे साल, कॉटन, मका व तांदुळ यापासून इथेनॉल बनवता येते.  यातून पेट्रोल-डिझेल ला पर्याय तर मिळेलच सोबतच सुमारे 50 लाख रोजगार देखील निर्माण होतील. त्यातूनच  आदिवासी आणि शेतकरी यांचीही प्रगती होईल, असा विश्वास नितीन गडतरींनी व्यक्त केलाय.