नाशिक :  नाशिकच्या वणी शहरातील पाच दुकानांना आग. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य रस्त्यावरील दुकानांना लागलेल्या  भीषण आगीत पाच दुकाने जळुन खाक झाली. अचानक दुकानांनी पेट घेतल्याने नागरिकांची  एकच धावपळ  उडाली. आगीत  लाखो रूपयांचे नुकसान झाले आसून ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक आंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


पुन्हा एकदा आगीच्या प्रश्नाने डोके वर काढले आहे. 2017 सरताना मुंबईतील कमला मिल परिसरात लागलेल्या आगीत अनेकांचा मृत्यू झाला. यापाठोपाठ घाटकोपरमधील फरसाण दुकानाला देखील आग लागली होती. यावेळी दुकानातील कामगारांचा मृत्यू झाला. 


मुंबई पाठोपाठच आता राज्यभरात आगीचा प्रश्न डोके वर करत आहे.