नागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. केवळ गांधी आडनाव लावल्याने कोणी गांधी होत नाही, सावरकरांचा इतिहास राहुल गांधींना माहिती आहे का अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. शिवसेनेनं दिलेली प्रतिक्रिया मवाळ आहे, सेनेची सत्ता सेनेला लखलाभ असो असं टीकास्त्र फडणवीसांनी सोडलं आहे. 


'स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले बलिदान हे राहुल गांधींना माहित नाही. अंदमानच्या जेलमध्ये राहून वेदना सहन करुन स्वातंत्र्य देवीची उपासना करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. सावरकरांच्या बलिदानाची गाथा हे राहुल गांधी कधीच समजू शकत नाही. ज्यांना देशाचा इतिहास माहित नाही. त्यांना सावरकर माहित होणार नाहीत. फक्त अडनाव गांधी लावून गांधी होत नाही. राहुल गांधी यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे.