नाशिक : वाहतूकदारांनी पुकारलेला देशव्यापी संप शुक्रवारी मागे घेण्यात आला. यावर वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत सरकार संवेदनशील असल्याचं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हंटलंय. वाहतूकदारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. या निर्णयानंतर कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.