नागपूर : Sanjay Raut on Navneet Rana : राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा इशाऱ्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल चढवलाय. त्यांनी भाजप आणि राणा दाम्पत्याला नौटंकीबाज म्हटले आहे. अलीकडच्या काळात भाजपने हिंदुत्वाची नौटंकी केली आहे. नवनीत राणा हे याच नौटंकीमधील एक पात्र आहेत. पण त्यांना मुंबईचं पाणी अजून माहिती नाही. शिवसैनिक त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ आहेत, असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.  (Shivsena leader Sanjay Raut on Navneet Rana)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनीत राणा यांनी 23 एप्रिलला मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठणाचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याचवेळी त्या आजच मुंबईत गनिमी काव्याने दाखल झाल्यात. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. मात्र, नवनीत राणा या केवळ स्टंटबाजी करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ती सिनेमातील लोक आहेत, त्यांना स्टंटचा अनुभव आहे. मात्र, त्यांच्या स्टंटबाजीने कोणताही फरक पडणार नाही. त्यांना काय करायचे आहे ते करु द्या. राणा दाम्पत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसैनिक सक्षम असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलेय.


संजय राऊत यांनी यावेळी भाजपवरही जोरदार टीका केली. हनुमान चालीसा वाचणे हा श्रद्धेचा विषय आहे, नौटंकी किंवा स्टंटचा नव्हे. पण भाजपने हिंदुत्वाची नौटंकी करुन ठेवली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा ही याच नौटंकीमधील पात्र आहेत. परंतु, भाजपच्या हिंदुत्वाच्या नौटंकीला जनता गांभीर्याने घेत नाही. हनुमान जयंती आणि रामनवमी हे सण आम्ही तुमच्यापेक्षा मोठ्याप्रमाणात मुंबईत साजरे करतो. त्यामुळे भाजपने आम्हाला शिकवू नये, असे ते म्हणाले.