रत्नागिरी : कोकणात तिन्ही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे, नद्या दुथडी वाहत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगडमध्ये काल संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर पहाटेपासून कमी झाला असला तरी महाड पोलादपूर तालुक्यात अधून मधून जोरदार सरी कोसळतायत.  सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही रात्रभर पावसाचा जोर कायम होता.  सिंधुदुर्गात संपूर्ण जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावलीय


रायगड जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. रात्री महाड, नागोठणे, रोहा, गावांना रात्री पुराचा धोका निर्माण झाला होता मात्र रात्री थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतल्याने धोका टळला सावित्री, गांधारी, आंबा, कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत आल्या होत्या. 



महाड रायगड रस्त्यावर दस्तुरी नाक्यावरती काल दोन फुटांपर्यंत पाणी आल्याने रात्री हा रस्ता वाहतूकी साठी बंद ठेवण्यात आला होता. आता पाणी ओसरल्याने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तिकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही रात्रभर पावसाचा जोर कायम होता.  सिंधुदुर्गात संपूर्ण जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावलीय. कणकवली, कुडाळ, सांवतवाडी सगळ्या महत्वाच्या तालुक्यात पावसानं जनजीवनावर परिणाम झालाय. 


रत्नागिरी जिल्हयात लांजा, मंडणगड, दापोली, खेड रत्नागिरीमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे काल पासून सुरू झालेला पाऊस अद्याप थांबण्याचा नावच घेत नाहीय. तर चिपळूणच्या वशीष्टी नदीला पूर आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळमध्ये पावसाची संततधार सकाळपासून सुरू आहे.