मुंबई : पूर्व-भारतात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व-विदर्भात २७ आणि २८ ऑगस्टला पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. यामुळे या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते. ज्यामुळे काही गावांचा संपर्कही तुटू शकतो. म्हणूनच नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.


कोकणातही पाऊस 


कोकणातही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात कोकणात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.