रायगड : रायगड जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस होत आहे, मात्र पहाटेपासून उरण तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उरणमधील चिरनेर गावात रस्त्यावर २ फुटापर्यंत पाणी आले  आहे, तसेच वाहने पाण्याखाली गेली आहेत.


अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे  नागरिक भयभीत झाले आहेत. पावसाचा जोर अचानक वाढल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे, यावर्षी  १९८९ नंतर प्रथमच अशा पुराचा अनुभव आला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे.