मुंबई : कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने MMRDA ला दिले आहेत. त्या जागेची स्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आलेयत. कांजूरमधील मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे. कांजूरमार्गच्या जागेचा वाद कोर्टात प्रलंबित असतानाही राज्य सरकारनं तो कारशेडसाठी दिला होता. वारंवार खोटी कागदपत्र पुढे करत राज्य सरकारनं दिशाभूल केली असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. 



या जमिनीमुळे सरकारचे ५ हजार ५०० कोटी रुपये वाचणार आहेत. मेट्रो लाईन ६, ४ आणि १४ साठी ही कारशेड महत्वाची असल्याचे ट्वीट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय.