अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : वरुड तालुक्यातील नांदगाव येथे राहणारे शेतकरी नंदकुमार बुरंगे (वय ४५) आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात शेताच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ मे रोजी नंदकुमार बुरंगे हे आपल्या शेतातून घराच्या दिशेने जात होते. याचवेळी त्यांचे नातेवाईक बबन आत्मारामजी बुरंगे (६०), सुरेश आत्माराम बुरंगे (५०), भूषण बबन बुरंगे (३२) आणि राजेंद्र ऊर्फ राजा श्रीराम ठाकरे (५०, सर्व रा. नांदगाव, वरुड) यांनी त्यांच्याशी पुन्हा शेतीचा वाद उकरून काढला.


या चारही नातेवाईकांनी नंदकुमार यांना मारहाण केली. फक्त मारहाण करून हे चारही जण थांबले नाही तर त्यांनी नंदकुमार यांच्या तोंडात जबरदस्तीने विष्टा कोंबली. या संतापजनक घटनेनंतर शेतकरी नंदकुमार यांनी बेनोडा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. 


या प्रकरणी बबन आत्मारामजी बुरंगे (६०), सुरेश आत्माराम बुरंगे (५०), भूषण बबन बुरंगे (३२) आणि राजेंद्र ऊर्फ राजा श्रीराम ठाकरे (५०, सर्व रा. नांदगाव, वरुड) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.