सांगली : एकीकडे राज्याच्या अनेक भागाला पुराचा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक लोकं बेघर झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण सांगलीमध्ये अशा कठीण परिस्थितीत देखील माणुसकी मेल्याचं चित्र आहे. कारण पूरग्रस्तांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाल्मीकी आवासमधील 45 लोकांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. पूरग्रस्त भागातील लोकांच्या घरात अनेक गोष्टी चोरीला गेल्या आहेत. वाल्मीकी आवासमध्ये महापुराचे पाणी आल्यामुळे लोकांना घर सोडून जावे लागले होते. पण याचा फायदा घेत काही माणुसकी हरवून बसलेल्या लोकांनी घरातील वस्तू चोरुन नेल्या.


घरातील संसार उपयोगी साहित्य आणि रोख रक्कम तसेच गॅस ,पैसे, लाईट मीटर, घरातील संसार उपयोगी वस्तु चोराने चोरल्या. या प्रकरणी नागरिकांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.