औरंगाबाद : पाचोड जवळील मुरमा शिवारात झालेल्या भीषण अपघातात नवरदेवाचा मृत्यू झालाय. नववधू-वर देवदर्शन  करून परत येताना दुधाची गाडी आणि बोलेरो गाडीची  समोरासमोर टक्कर होऊन अपघात  झाला. या अपघातात नवरदेवासह आणखी एक प्रवाशाता मृत्यू झाला. तर ३ जण जखमी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड जवळ आज सकाळी एक दुर्दैवी अपघात झाला या अपघातात चार तारखेला लग्न झालेले अमित गोडसे यांचा जागीच मृत्यू झालाय, लग्नानंतर गोडसे कुटुंबीय देवदर्शनासाठी तुळजापूरला गेले होते. ते देवदर्शन करुन परत येत असताना दुधाची गाडी आणि गोडसे यांची जीप यांची समोरासमोर धडक झाली. यात गाडी चालवत बसलेले नवरदेव अमित जागीच ठार झाले तर नववधू अश्विनीला अपघातात आपला पाय गमवावा लागला. इतर तीन जणांवर औरंगाबादमध्ये उपचार सुरु आहेत.


लग्नानंतर आता कुठं नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती. मात्र काळाच्या घाला या नवं दाम्पत्याचे आयुष्य उध्वस्त करून गेलाय. या घटनेनंतर जालन्यातील अंबड तालुक्यतील खर्डा गावात दुःखाचे वातावरण आहे.