COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यास ज्या हालचाली कॉंग्रेसने केल्या त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही हालचालींना वेग आलाय. कॉंग्रेसचा सतत होत असलेला पराभव, मिळत असलेले अपयश पाहता कॉंग्रेसमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.   मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे नवे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  मागच्या विधानसभा निवडणुकीत झालेला दारूण पराभव आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पराभवामुळे कॉंग्रेस नेते- कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली होती.


मोहन प्रकाश यांची उचलबांगडी


ही मरगळ भरून काढण्यास मोहन प्रकाश अपयशी झाल्याचे दिसून आले. दरम्यान पक्षात नवा उत्साह, राज्यात जोमाने उभा करण्यासाठी प्रयत्नांना वेग आला आहे. मोहन प्रकाश यांची उचलबांगडी करुन मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.