औरंगाबाद : राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता क्षीरसागर यांच्या घरी पोहचले आहेत. त्यामुळे या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.


एका विमानाने प्रवास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे याही आहेत. मुंबईहून मुख्यमंत्री, क्षीरसागर एकाच विमानाने औरंगाबादला आले. तिथून एकाच हेलिकॉप्टरने ते बीडला रवाना झाले. हेलिपॅडवर येताच क्षीरसागर यांच्या घराकडे सीएम फडणवीस यांचा ताफा रवाना झाला. 


‘मुख्यमंत्र्यांचे आमच्या लोकांवरील प्रेम जास्त वाढतंय’


भाजपचे नेते राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घरी जाणे हे चांगले आहे. ते भाजपमध्ये जातील असे मला वाटत नाहीत. त्यांची कशीही नाराजी नाही. ते पक्षातच आहेत. मुख्यमंत्र्यांचे आमच्या लोकांवरील प्रेम जास्त वाढत चालले आहे. त्यांची सरकार वाचवण्याची कसरत सुरू आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी यावर दिली.


जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील मोठे मानले जातात. ते राष्ट्रवादीचे माजी मंत्री होते. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास हा राष्ट्रवादीसाठी मोठा दणका मानला जाईल.