उस्मानाबाद : जात पंचायतचा एक अजब निर्णय दिलाय. अनैतिक संबंधाच्या संशयावरून जातपंचायतने एका तरुणाला केला २ लाखाचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास जातीतून बहिष्कृत करून वाळीत टाकण्याची धमकी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला बसलेला जात पंचायतींचा विळखा काही केल्या सैल होत नाही. उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात जातपंचायतीच्या पंचांवर गुन्हा दाखल करून रात्री उशिरा केली तिघांना अटक केलीय. 


उस्मानाबादमध्ये जात पंचायतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाला २ लाखाचा दंड केलाय. दंड भरला नाही, तर जातीतून बहिष्कृत करून वाळीत टाकण्याची धमकीही देण्यात आली होती. उस्मानाबाद शहरातील साठे नगरच्या पारधी वस्तीत साधारण दीड महिन्यापूर्वीचीही घटना आहे.