Kalicharan Maharaj Controversial Statement : कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि मुलीला प्यायला द्या मग डोकं ठिकाण्यावर येईल, सर्व भूत प्रेम तंत्र मंत्र बाहेर येईल, असा दावा कालीचरण महाराजांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण उघडकीस आल्यावर संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धाचा बॉयफ्रेंड आफताब पूनावालाने तिला संपवलं होतं. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू धर्माच्या वतीने लव्ह जिहाद कायदा करण्याच्या मागणीसाठी आज बुधवारी अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये कालीचरण महाराज आणि काजल दीदी हिंदुस्थानी सहभागी झाले होते.


लव्ह जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रासह देशभरात लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मुस्लिमांवर विश्वास ठेवू नका. रोज 1 लाख गोवंश हत्या होतात. हिंदू द्वेष करत नाही मात्र हिंदूंच्या मनात द्वेश निर्माण होत आहे, असा दावाही कालीचरण महाराजांनी केला आहे. 


कालीचरण महाराजांनी यावेळी बोलताना, सर्व आतंकवादी हे मुस्लिमच आहेत. जर सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते तर हिंदू राष्ट्र झालं असतं, असं म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांचे नाहीतर संपूर्ण हिंदूंचे राजे होते, असंही कालीचरण महाराज म्हणाले. आता कालीचरण महाराजांनी केलेल्या अजब दाव्यांमुळे मोठा वाद होण्यची शक्यता आहे.