अंबरनाथ : ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाने मंगळवारी सगळ्याच शहरांना अक्षरशः झोडपून काढले. आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तो अंदाज खरा ठरला.


आज अंबरनाथ बदलापूर शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण बदलापूर महामार्ग पाण्याखाली आला आहे. महामार्गशेजारी असलेल्या नाल्यातील पाणी महामार्गावर आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंबरनाथ बदलापूर शहरातील अनेक सखल भागात या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पाणी साचले आहे. गेल्या २४ तासात अंबरनाथ तालुक्यात १४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.