Latur News : उज्ज्वल भवितव्यासाठी फार कमी वयापासूनच अनकेजण स्वप्न पाहू लागतात. मध्यमवर्गीय कुटुंब असो किंवा पैशांची चणचण असणारं एखादं कुटुंब असतो, या सर्वच कुटुंबांतील तरुण पिढी भविष्यात यश संपादन करून सर्व सुखसोयी आणि एक सुरेख आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहते. पण, याच स्वप्नांचा पाठलाग करत असताना काहीजण मात्र अनेक अडचणींच्या दबावाखाली येत चुकीची पावलं उचलतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूरमधून अशीच एक घटना समोर आली, जिथं आर्थिक विवंचनेतून 17 वर्षीय विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं. लातूरमधील या घटनेनं एकच खळबळ माजली आहे.  लातूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. 


उपलब्ध माहितीनुसार ही मुलगी मुळची धाराशिव जिल्ह्यातील विजोरा या गावातील होती. लातूरला ती शिक्षणासाठी आली होती. घरची परिस्थिती सुरुवातीपासून बेताची. तरीदेखील तिच्या आई-वडिलांनी तिला लातूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिला होता. दहावीत 100 पैकी 100 गुण घेतले असल्यामुळे ती शिक्षणात उज्वल भविष्य काढेल असा तिच्या आई वडिलांना विश्वास होता. 


हेसुद्धा वाचा : Google Map मुळं बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये दिसला रहस्यमयी दरवाजा; Viral Photo मुळं वाढला गुंता 


प्रत्यक्षात मात्र शिक्षणाचा, वसतीगृहात राहण्याचा आणि खानावळीसह इतर खर्च जास्त होत असल्याने घरातल्या लोकांची ओढाताण होत असल्याचा खर्च आणि परिस्थितीची तिला जाणीव झाली होती. याबाबत ती आपल्या आईकडे सातत्याने नाराजीसुद्धा व्यक्त करत होती. सरतेशेवटी कुटुंबाची होणारी ही आर्थिक विवंचना पाहून या मुलीनं अखेर टोकाचं पाऊल उचललं आणि वसतीगृहातील स्वतःच्या रूममध्ये गळफास घेत तिने आयुष्य संपवलं. प्राथमिक तपासातून यासंदर्भातील माहिती समोर आली. 'सॉरी मम्मी पप्पा' असं लिहिलेली एक चिठ्ठी तिच्या रूममध्ये सापडल्याचंही सांगितलं जात आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आता पुढील तपास पोलीस करत आहेत.