मुंबई : उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यात वरुणराजाने काल सकाळपासूनच हजेरी लावली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी या भागात पडलेल्या पाऊसामुळे अनेक सभा, रोड शो रद्द झाले तर काही उमेदवारांना भरपावसात सभा घ्याव्या लागल्या, मात्र वरूणाराजाने हजेरी लावल्याने बळीराजा शेतकरी आता सुखावला असून पेरणी झालेल्या ज्वारी पिकाला आता जीवदान मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई, पनवेल, उरण या परिसरात शनिवार पासून रिमझीम पावसाला सुरुवात झाली. आज दिवसभर असाच पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शनिवारी भर पावसातच उमेदवारांनी आपला प्रचार केला. 


बीड जिह्यातही रात्री रिमझिम पावसाने हजेरी लावली. रिमझिम पडणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर, शेतात पाणी साचले.