Election Live Updates: रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे उमेदवार? 19 एप्रिलला भरणार अर्ज

Wed, 17 Apr 2024-10:32 pm,

Loksabha Election 2024 Live Updates: पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने प्रचारसभांचा जोर पाहायला मिळणार आहे. तसेच राज्यातील इतर मतदारसंघांमधील नियोजन आणि आढावा बैठकींचं सत्रही आज सुरु असणार आहे. दिवसभरातील घडामोडींवर संक्षिप्त स्वरुपात घेतलेला आढावा...

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार असून आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. देशात एकूण 21 राज्यांमध्ये 102 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर हे पाच मतदारसंघ आहे. आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेक बड्या नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. तसेच देशातील अन्य 20 राज्यांमध्येही प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहेत. दिवसभरातील घडामोडींवर आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत.

Latest Updates

  • आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या... नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा -गोंदियातील प्रचार आज संपला.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय...तर देशात 21 राज्यात 102 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे...प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या.

  • धाराशिवमध्ये मनीषा राखुंडे-पाटलांच्या घरावर हल्ला झाला आहे.  राखुंडे पाटील या शरदचंद्र पक्षाच्या महिला पदाधिकारी आहेत. हल्ल्यातून मनीषा राखुंडे-पाटील थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांच्या वाहनांची तोडफोड करून हल्लेखोर फरार झाले आहेत. 

  • गडकरींवर विकास ठाकरेंनी साधला निशाणा

    नागपूर : विकास ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुद्दे लोकसभा निवडणुकीत दिसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ही लोकसभेची निवडणूक आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीत मुद्दे उपस्थित व्हावे ते मुद्दे लोकसभा निवडणुकीत दिसत आहेत, असं विकास ठाकरे म्हणाले आहेत. लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं आहे. मतदारसंघात चांगल्या शाळा नाहीच, आरोग्य केंद्र नाहीत, विजेचे बिल भरमसाट वाढले आहे. विविध समाजाला न्याय देण्याच कामही झालेलं नाही. तानाशाही,आणि हिटलरशाही पद्धतीने पक्ष उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. विरोधकच संपवायचे काम चालू आहे. मागील 10 वर्षांमधील आश्वासने पूर्ण केली नाही म्हणून पक्ष फोडण्यात आलेत, असा टोला विकास ठाकरेंनी लगावला आहे. विकास ठाकरेंनी नितीन गडकरींवर निशाणा साधताना, 'मतं मागायला जाणार नाही असे आधी असे म्हणायचे नंतर आता मतं मागायची,' असं म्हटलं आहे.

  • ईशान्य मुंबईसाठी उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

    पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेनाभवन येथे ईशान्य मुंबईतील पदाधिका-यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ईशान्य मुंबई उमेदवार संजय दिना पाटील आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

  • राज ठाकरेंनी जाहीर केली समन्वयकांची यादी

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लेाकसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याच्या घेतलेल्या भूमिकेला धरून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी राज ठाकरेंच्या आदेशानुसार पक्षाचे नेते व सरचिटणीस यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अमित ठाकरेंकडे पुण्याची समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाण्याची जबाबदारी अभिजित पानसेरेंवर सोपवण्यात आली आहे. तर पालघरची जबाबदारी अविनाश जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भिवंडी / कल्याणची जबाबदारी राजू पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

  • MIM Support To VBA | Asaduddin Owaisi यांनी Prakash Ambedkar यांना लोकसभेसाठी दिला पाठिंबा

    निवडणुकीसंदर्भातील लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

  • 'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडू (Ajit Pawar) भेटीगाठीचं सत्र सुरु आहे. बुधवारी अजित पवार यांनी इंदापूरातील डॉक्टर, वकिल आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पण यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद (Controversy) उफाळून येण्याची शक्यता आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

  • माझ्यामुळे पक्ष आहे म्हणणारे...; महाजनांचा खडसेंना टोला

    एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेश करणार असे स्पष्टपणे सांगितले आहे. तरी देखील भाजपाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जळगाव येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यातून टीका केली आहे. "मी मी म्हणणारे चालत नाही. ज्यांचे पुण्य संपले तेच या पक्षातून बाहेर पडले आहे. आता बघा तुमचा भविष्यकाळ. ते, मी मी म्हणणारे होते त्यांचे काय झालं तुम्ही बघितलं. 35-35 वर्ष आमदारकी भोगली 20- 20 वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले. माझ्यामुळे पक्ष मी हाय म्हणून पक्ष अशा अविर्भावात फिरणारे लोक आता कुठे थप्पीवर जाऊन पडले आहेत," असं महाजन म्हणाले. उन्मेष पाटील यांच्यावर टीका करताना मंत्री गिरीश महाजन यांचं नाव न घेता एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

  • Mumbai | Anil Desai यांच्या प्रचारकडे Congress ने फिरवली पाठ, सांगलीनंतर मुंबईतही काँग्रेस नाराज

    निवडणुकीसंदर्भातील लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

  • 'एका व्यक्तीची इच्छा..'; संविधान बदलण्यासाठी 'रामायण' फेम गोवील यांचा पाठिंबा?

    मध्य प्रदेशमधील फैजाबादमधील विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार लालू सिंह यांनी भारतीय संविधानात बदल करण्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. असं असतानाच आता भाजपाचे मेरठ मतदारसंघातील उमेदवार आणि रामायण मालिकेमुळे घराघरात पोहचलेले ज्येष्ठ अभिनेते अरुण गोवील यांच्या विधानामुळे या वादात पुन्हा नव्याने भर पडल्याचं दिसत आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...

  • रत्नागिरी - सिंधुदुर्ग आणि संभाजीनगर तिढा सुटला

    निवडणुकीसंदर्भातील लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

  • मविआला 35 तर इंडिया आघाडीला देशात 305 जागा मिळतील: राऊत

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 35 जागा जिंकेल अशा विश्वास व्यक्त केला आहे. देशात इंडिया आघाडी यशस्वी होईल असं सांगताना राऊत यांनी थेट किती जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून येतील याबद्दलचं भाकित केलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 आणि देशात 'इंडिया आघाडी'ला 305 जागा मिळतील, असं राऊत म्हणाले आहेत.

  • रामटेकमध्ये CM शिंदेंच्या रोड-शोला सुरुवात;  कापणार 4 किमीपर्यंतचं अंतर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघात उमरेड येथे रोडशो सुरू आहे. शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्या समर्थनासाठी उमरेड येथील गांगापुर चौकातून हा रोड-शो सुरु झाला आहे. प्रचाराच्या तोफा थंड होण्याच्या काही तासआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेक लोकसभा मतदारसंघात करताय रोड-शो करत आहेत. हा रोड-शो 3 ते 4 किलोमीटरपर्यंतचं अंतर पार करणार आहे.

  • 'फडणवीसांना आकडे लावण्याची सवय, सर्व्हेची आकडेवारी मान्य नाही; आम्हीच जिंकणार'; राऊतांचा हल्लाबोल

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वेक्षणाच्या आकडेवारीशी आपण सहमत नसल्याचं सांगतानाच महाविकास आघाडीला नक्कीच यश मिळेल असं मत व्यक्त केलं आहे. "पहिल्या टप्प्यात आमचे उमेदवार नाहीत, पण महाविकास आघडीचे उमेदवार आहेत. कुणी काहीही म्हणू द्या, कितीही सर्व्हे येऊ द्या परिवर्तनांची सुरुवात ही विदर्भातून होते. लोक पक्ष नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार बघत आहेत. रामटेकमध्ये आमचा उमेदवार नाही पण महाविकास आघाडीसाठी मी बैठक घेत आहे. निवडणूकीला हळूहळू रंग चढत जाईल, जे सर्व्हे येत आहेत त्याबाबद्दल आम्ही सहमत नाही. आम्हाला महाराष्ट्र शंभर टक्के यश मिळेल. देवेंद्र फडणवीस जे सांगत आहे. 45+ त्याचे आकडे काहीही असू द्या त्यांना आकडे लावण्याची सवय आहे. निवडणूकीनंतर त्यांना आकडे लावण्याच्या धंद्यात पडावे लागेल," असा टोला संजय राऊथ यांनी लगावला आहे.

  • पुण्यात अमित ठाकरे- मोहोळ भेट

    महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंची भेट घेणार आहेत. अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून याच दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. मनसेच्या शहर कार्यालयामध्ये दुपारी दीडच्या सुमारास ही भेट हेणार आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.

  • महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?

    देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाला वळण देणारी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून, अवघ्या काही तासांतच या निवडणुकीअंतर्गत पहिल्या टप्प्य़ातील मतदान पार पडणार आहे. सध्या सर्वत्र या टप्प्याच्या अनुषंगानं अखेरच्या क्षणी प्रचारसभा सुरु असून, बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व पक्षांचा प्रचार थांबणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद? जाणून घ्या येथे क्लिक करुन...

  • 'अजित पवारांनी भरलं होतं बारचं बिल'

    रघुनाथ राजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या कॉलेज जीवनातील एक किस्सा सांगितला."1982 साली कॉलेजमधील निवडणुकीत स्टेफिन बारमध्ये 11 हजारांचं बिल केलं होतं. ते भरायला आमच्याकडे पैसे नव्हते. पण ते बिल अजित पवारांनी भरले," असं रघुनाथ राजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितलं. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार त्यावेळेस आमच्या सोबत होते म्हणून अजित पवारांनी हे बिल भरलं, असं रघुनाथ राजे नाईक-निंबाळकर म्हणाले. कॉलेज जीवनातील हा पार्टीचा किस्सा रघुनाथ राजे नाईक-निंबाळकर यांनी जाहीर कार्यक्रमात बिनधास्तपणे सांगितला. 

  • मी तोतया नाईक-निंबाळकर नाही

    फलटणच्या रघुनाथ राजे नाईक-निंबाळकर यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. "मी तोतया नाईक-निंबाळकर नाही. मी मुधोजी मनमोहन राजवाड्यातील अनभिषिक्त राजाचा नातू आहे," असं रघुनाथ राजे नाईक-निंबाळकर म्हणाले आहेत.

  • नंदूरबारमध्ये काँग्रेस करणार जोरदार शक्तीप्रदर्शन

    काँग्रेस लोकसभेचे उमेदवार गोवाल पाडवी 23 एप्रिला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसचे अनेक नेते उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, सतीश पाटील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या अर्ज भरण्याच्यानिमित्ताने काँग्रेस नंदुरबार शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असून विजयासाठी सर्वस्व प्रयत्न काँग्रेसकडून केले जात आहेत. काँग्रेसने ऐनवेळी नवीन उमेदवार दिल्याने अनेक नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस जिल्ह्यात आपली ताकद दाखवण्याच्या प्रयत्न या निमित्ताने करणार आहे. नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसच्या बालेकिल्ला राहिला असून यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे.

  • कोल्हेंचा जीभेवरील ताबा सुटतोय; आढळराव पाटलांचा टोला

    'पलटी सम्राट'पेक्षा नटसम्राट बरा म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर निशाण साधला होता. या टीकेवर आता महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटलांनी कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. "अमोल कोल्हे केव्हा काय बोलतील याचा नेम नसून कोल्हे यांना आता बरळायची सवय लागली आहे. अजित पवारांवर टीका करणे हा कोल्हेंचा प्रसिध्दी मिळवण्याचा डाव असून त्यांना पराभव दिसत असल्याने त्यांचा जिभेवरील ताबा सुटत चालला आहे," असा टोला आढळराव पाटलांनी लगावला.

  • काँग्रेसला एकमेव मतदारसंघ राखता येणार का?

    पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये सर्वांचे लक्ष लागले आहे ते चंद्रपूर मतदारसंघावर! येथे सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर याच्यात थेट लढतत होणार आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रातील केवळ चंद्रपूरची एकमेव जागा काँग्रेसकडे होती. त्यामुळे काँग्रेस आपला हा बालेकिल्ला राहणार का हे देखील पाहावे लागणार आहे.

  • एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

    Eknath Khadse Death Threat : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरु असताना राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं खळबळजनक वृत्त नुकतंच समोर आलं. खडसे यांना चार वेगवेगळ्या मोबाईलवरुन धमकीचे फोन आले. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...

  • पहिल्या टप्प्यात गडकरींचं भविष्य मतपेटीत होणार कैद

    पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रतील विदर्भातील पाच जागेवर 19 तारखेला मतदान होणार आहे. भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरींचं भविष्य 19 तारखेला मतपेटीत कैद होणार आहे.

  • एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

     

    Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये.. चार वेगवेगळ्या मोबाईलवरुन त्यांना धमकीचे फोन आलेत.. दाऊद आणि शोटा शकीलकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये... यासंदर्भात एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीये.. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.. 15 आणि 16 एप्रिलला हे फोन आल्याची माहिती खडसेंनी तक्रारीत दिलीये.. 

  • जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही; तटकरेंचा गीतेंना इशारा

    रायगडकर संकटात होते तेव्हा तुम्ही कुठं होतात? असा सवाल विरोधक रायगडमधील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना विचारत आहेत. याबाबत विचारले असता अनंत गीते यांनी हा मुद्दा हसण्यावारी नेला. 'या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही,' असं अनंत गीते म्हणाले. गीते यांच्या हसण्याचा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. 'जनतेवर जेव्हा संकट येतं आणि त्याबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर तुम्ही हसताय ही जनतेची क्रूर चेष्टा आहे. आता जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा तटकरे यांनी गीतेंना दिला आहे.

  • काँग्रेसला एकमेव मतदारसंघ राखता येणार का?

    पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये सर्वांचे लक्ष लागले आहे ते चंद्रपूर मतदारसंघावर! येथे सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर याच्यात थेट लढतत होणार आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रातील केवळ चंद्रपूरची एकमेव जागा काँग्रेसकडे होती. त्यामुळे काँग्रेस आपला हा बालेकिल्ला राहणार का हे देखील पाहावे लागणार आहे.

  • पहिल्या टप्प्यात गडकरींचं भविष्य मतपेटीत होणार कैद

    पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रतील विदर्भातील पाच जागेवर 19 तारखेला मतदान होणार आहे. भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरींचं भविष्य 19 तारखेला मतपेटीत कैद होणार आहे.

  • माढामध्ये पवार वाढवणार भाजपाचं टेन्शन

    शरद पवार यांनी धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांना आज भेटीला बोलवलं आहे. सकाळी 8 वाजता पुण्यात जानकर शरद पवारांना भेटले असून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. या भेटीमध्ये माढाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील ही उपस्थित असणार आहेत. उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्यास माढा मध्ये भाजप मोठ्या संकटात येईल असं चित्र दिसत आहे.

  • महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस

    पूर्व महाराष्ट्रातील विदर्भामधील 5 मतदारसंघांमधील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.  नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांमध्ये आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link