Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Fri, 24 May 2024-10:28 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • नागपुरात कारचालकाने 3 जणांना उडवलं

     

    Nagpur Accident : नागपूर शहरातील दाटीवाटीच्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ, कारचालक तरुणानं तिघांना उडवलं. गंभीर बाब म्हणेज कारचालक आणि गाडीत बसलेले त्याचे इतर 2 सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. तसंच गाडीत दारूच्या बाटल्याही सापडल्या. कारचालकानं आई, वडील यांच्यासह अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं असून, त्या बाळाची प्रकृती गंभीर आहे. 

  • डोंबिवलीतील स्फोट प्रकरणी अमुदान कंपनीला क्लोजर नोटीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dombivli Blast Case : डोंबिवली MIDC मधील अमूदान कंपनीला क्लोजर नोटीस बजावण्यात आली आहे. स्फोट प्रकरणी कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही नोटीस बजावली आहे.

     

  • डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू 

     

    Dombivli Blast Case : डोंबिवली MIDCतील अमुदान कंपनीच्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झालाय...तर 55 जण जखमी झालेत...याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने दोघांना ताब्यात घेतलंय...कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता या मायलेकांना ठाणे गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय...मालती मेहता यांनी नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ठाणे क्राईम ब्रांचनं त्यांची कस्टडी घेतलीये...तर मलय मेहताला ठाणे क्राईम ब्रांचनं ठाण्यातूनच ताब्यात घेतलंय....मालती मेहता नाशिकमध्ये त्यांच्या नातेवाईकांडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती...त्यानुसार नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं...

  • पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी 2 पोलीस कर्मचारी निलंबित

     

    Pune Car Accident Case : पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील २ कर्मचारी निलंबित करण्यात आलंय...पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी दोघांची नावे....तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही..असा ठपका ठेवत दोघांचे निलंबन.. 

  • तळीरामांसाठी खूशखबर !, लोकसभा निकाल जाहीर होताच दारूविक्री खुली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Dry Day : 4 जूनला लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होताच मुंबईत तळीरामांचा जल्लोष जोरात असणार आहे. मुंबई जिल्हाधिका-यांनी 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे लागू केला होता. त्याला हॉटेल व्यावसायिकांच्या आहार संघटनेनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, मुंबईत दारूविक्री खुली करायला कोर्टानं परवानगी दिली. जिल्हाधिका-यांच्या आदेशामुळे बेकायदेशीर दारूविक्री होण्याची शक्यता याचिकेत वर्तवण्यात आली होती. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • डोंबिवलीतील अमुदान कंपनीतील स्फोट प्रकरण, मालक मालती मेहता पोलिसांच्या ताब्यात

     

    Dombivli Blast Case : डोंबिवली स्फोटातील अमुदान कंपनीच्या मालक मालती मेहता यांना नाशिकमध्ये ताब्यात घेतलंय... नाशिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीये...स्फोट झाल्यापासून कंपनीच्या मालक मालती मेहता यांचा शोध घेतला जात होता...ठाणे क्राईम ब्रँच त्यांचा शोध घेत होती...नाशिक शहरात त्या असल्याची माहिती मिळाली त्यानुसार ठाणे क्राईम ब्रांचने नाशिक पोलिसांशी संपर्क साधला...नाशिकमधील पंचवटी पोलिसांनी पेठरोड परिसरातून एका नातेवाईकाकडून त्यांना ताब्यात घेतलंय...ठाण्याची क्राईम ब्रांचची टीम नाशिकमध्ये पोहोचली आणि त्यांनी मेहता यांना ताब्यात घेतलंय...त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय...

  • पुणे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालसह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी

     

    Pune Car Accident Case : पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच इतर 5 आरोपींनाही शिवाजीनगर कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली... सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी आरोपी विशाल अग्रवालच्या घरातील CCTV कॅमे-याच्या DVRमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला... तसंच ड्रायव्हरकडे आणखी चौकशी करायची असून, सर्व आरोपींचीही चौकशी करायची असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं. यासाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली.... तर आरोपींवर लावण्यात आलेली कलमं जामिनपत्र असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला...

  • रेशीम अनुदान देण्यासाठी लाच

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dharashiv : धाराशिवच्या जिल्हात रेशीम कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक सुर्यवंशी यांचा शेतकऱ्यांकडुन पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला...शेतक-यांकडून रेशीमचे अनुदान काढण्यासाठी 5 हजार रुपये घेताना सहाय्यक अधिकारी कॅमे-यात चित्रित झालाय... या प्रकरणी रेशीम विकास अधिकाऱ्यांनी संबधित क्षेञ सहाय्यकाला कारणे दाखवाची नोटीस दिलीय...नोटीशीचे उत्तर आल्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती विकास अधिकारी एस वराट यांनी दिली...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुणे पोलीस आयुक्तांची बदली करा - रवींद्र धंगेकर

     

    Pune Ravindra Dhangekar : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय...त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीलंय...पुणे पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी धंगेकरांनी पत्राद्वारे केलीये...त्याचबरोबर अपघात प्रकरणाचा तपास त्रयस्थ यंत्रणेकडे देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केलीये...

  • पुरावे बदलण्याचा प्रयत्न - पोलीस आयुक्त अमितेश कुमार

     

    Pune Car Accident Update : पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न पुणे अपघात प्रकरणात करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. पुरावे नष्ट करणा-याचा प्रयत्न करणा-यांवर कलम 201 लावण्यात येणार आहे.. मुलाला वाचवण्यासाठी ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न केला गेला असा दावाही पुणे पोलिसांनी केलाय.. 

  • सांगलीत उष्माघातानं कोंबड्या दगावल्या

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sangli Heatwave : उष्माघातामुळे तब्बल बाराशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या पलूस तालुक्यातील आंधळी गावात घडली. सीताराम जाधव यांच्या पोल्ट्रीमधल्या 1200 कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झाला. वाढतं तापमान त्यातच मंगळवारी भर दुपारी अचानकपणे लोडशेडिंग झालं त्यामुळे उष्माघाताने या कोंबड्या दगावल्या. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकाचं लाखों रुपयाचं नुकसान झालं. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नागपुरातील पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur : पुण्यातील कल्याणीनगर अपघातानंतर नागपुरातील पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आलंय... पोलिसांनी नियमांची मायमल्ली करणाऱ्या 8 बार रेस्टॉरंट, 3 रूफ टॉपवर कारवाईचा बडगा उगारलाय. पुण्यातील घटनेनंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी बार, पबवर कारवाई करण्यात येत आहे. तर पोलिसांनी बार, रेस्टॉरंट आणि पब मालकांना नियमांचं काटेकोर पालन करण्यास सांगितंय. 

    बातमी पाहा - पुणे अपघातानंतर नागपूरमध्ये बेकायदेशीर बार, पबवर कारवाईचा बडगा

  • नोकरांच्या धाडसामुळे दरोडोखोर जेरबंद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune : पुण्यात नोकरांच्या धाडसामुळे 3 दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश आलंय...धाडसी नोकरांनी मालकाच्या घरात दरोडा टाकणा-या दरोडेखोरांना घरात डांबून ठेवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलंय...प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील चांदणी चौक परिसरात पाण्याच्या टाकीजवळ कलासागर नावाची सोसायटी आहे...याच सोसायटी पुरोहीत नावाच्या रहिवाश्याचा फ्लॅट आहे...त्यांचा केटरींगचा व्यवसाय असून त्यांच्या घरी नोकर असतात...मात्र काही कामानिमित्त पुरोहीत कुटुंबिय गावी गेले असताना तिघेजण एका दुचाकीवर आले. घरात दोघेच जण असल्याचे पाहून तिघेजण अचानक घरात शिरले. नोकरांना धाक दाखवून घरातील तिजोरी कुठे ठेवलीय याची विचारणा केली...तिजोरी कुठे आहे हे न सांगितल्यास आपल्या जीवावर बेतू शकतं हे पाहता त्याने तिजोरी बाबत सांगितले...यावेळी तिघेही जण तिजोरी बाहेर ओढून आणत असताना त्यातील दोन्ही नोकरांनी शक्कल लढवत दरोडेखोरांना घरातच बंद करून बाहेरून कडी लाऊन घेतली...आणि दरोडेखोरांना पोलिसांच्या हवाली दिलं...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • स्फोटाला मालकांसह, सरकार जबाबदार - अंबादास दानवे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ambadas Danve On Dombivli Blast : डोंबिवली दुर्घटनेला उद्योग विभाग आणि सरकार जबाबदार आहे असा आरोप विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय. डोंबिवली MIDC त जिथे स्फोट झाला तिथली पाहणी दानवेंनी केली.. यावेळी दानवेंनी हल्लाबोल केला.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • वाशिममध्ये भीषण पाणीटंचाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Washim Water : वाशिम जिल्ह्यातील खैरखेडावासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. वाढलेल्या तापमानामुळे वाशिम जिल्ह्यातील जलपातळी झपाट्याने खालावली असून काही गावांत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. मध्यम प्रकल्पात 19 टक्के तर लघू प्रकल्पात फक्त 16टक्के जलसाठा उपलब्ध आहे.जिल्ह्यातील 13 गावाना पाणी टंचाईची समस्या जाणवतेय. सर्वाधिक पाण्याची कमतरता ही खैरखेडा गावात जावणतेय. महिला, पुरुषांसह लहानग्यांपासून वयोवृद्धांनाही पाण्यासाठी भर उन्हात दोन किलोमीटर अंतराचा घाट रस्ता चढून पाण्याची गरज भागवावी लागतेय..तसंच पाण्याअभावी  युवकांचं लग्न जमत नसल्याचंही सांगण्यात येतंय.  त्यामुळे प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू करण्याची मागणी खैरखेडा ग्रामस्थ करतायत. दरम्यान, जिल्ह्यात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून पाणी टंचाईबाबत उपाययोजना सुरू असल्याचं जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी सांगितलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुळशी धरणात 17.98 टक्के पाणीसाठा 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mulshi Dam Water : मावळच्या मुळशी धरणात केवळ 17.98 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्याअखेर पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागलंय... मावळचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यँत पोहोचलाय... याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होऊ लागलाय.... त्यामुळे 40 गावांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागणारे...यासाठी पुणे पाटबंधारे खात्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • अपघातातील पोर्श कारची फॉरेन्सिक तपासणी

     

    Pune Car Accident Update : पुणे कल्याणीनगर अपघातातील आलिशान पोर्श कारची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आलीय. पुणे पोलिसांनी अपघातातील कार जप्त केली होती. गाडीची वेग मर्यादा, कॅमेरे, चित्रीकरण, अपघातानंतर झालेली कारची अवस्था याचा पथकानं आढावा घेतलाय. यासंबंधीचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.. 

  • डोंबिवलीतील स्फोट प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dombivli Blast Update : डोंबिवलीतील स्फोट प्रकरणी आणखी एकाचा मृत्यू झालाय...त्यामुळे आतापर्यंत एकूण 9 जणांचा मृत्यू झालाय...दुस-या दिवशीही NDRF, TDRF कडून शोधमोहीम सुरू आहे...स्फोटाच्या ठिकाणी सर्व सामान छिन्न विच्छिन्न अवस्थेत आहे...त्यामुळे ढिगाऱ्याखाली कोणी अडकलंय का? याचा शोध घेतला जातोय...स्फोटात संपूर्ण कंपनी उद्धवस्त झाली असून, अजूनही शोध कार्य सुरू आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • डोंबिवलीतील स्फोट प्रकरण, कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल

     

    Dombivli Blast Update : डोंबिवली एमआयडीसी कंपनी रिअ‍ॅक्टर ब्लास्ट प्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता या कंपनीच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. याप्रकरणी आता कारवाईला वेग आलाय...

  • कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात कारवाईला वेग

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Car Accident Update : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी पोलिसांची 10 पथकं स्थापन करण्यात आलीयेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडून पथकातील पोलीस अधिका-यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. तपासाबाबत सर्व पथकांना सूचना देण्यात आल्यात. प्रत्येक पथकाला जबाबदारी आणि काम ठरवून देण्यात आलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - Pune Car Accident Action Update पॉर्श अपघात प्रकरणी कारवाईला वेग, तपासासाठी पोलिसांची 10 पथकं स्थापन

  • प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध सुरुच

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Akole Rescue Operation : प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध अजूनही सुरूच आहे...अद्यापही 2 नागरिक बेपत्ता आहेत...त्यांचा शोध घेण्यासाठी टीडीआरएफची टीम शोध मोहीम राबवणार आहे...दोन नागरिकांचा शोध अजून लागलेला नाही...कालच या नागरिकांचा शोध घेताना बोट उलटून तीन एसडीआरएफच्या जवानांचा मृत्यू झाला होता...त्यामुळे पाण्याचा प्रवाह शून्य करण्याचे आदेश विखे पाटलांनी दिलेत...त्यानंतर पाटबंधारे विभागाने पाण्याचा प्रवाह कमी केला असून आता शोध घेतला जाणाराय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विदर्भात तापमानाचा पारा वाढला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vidharbha Heat : विदर्भात उष्णतेचा कडाका वाढलाय. अकोल्यात 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची ही नोंद आहे. सध्या मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असून मान्सूनची प्रतीक्षेत आहेत. अशात तापमानाचा पारा वेगानं वर जातोय. दिवसभर उन्हाचे चटके जाणवत आहेत. तर रात्री नागरिक घामाघूम होताना दिसतायत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासन करतंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विशाल अग्रवालची पोलीस कोठडी आज संपणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Car Accident Update : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी आज संपतेय. आतापर्यंत मुलाचे वडील विशाल अग्रवाल, हॉटेलचा मालक प्रल्हाद भुतडा, हॉटेल व्यवस्थापक सचिन काटकर, ब्लॅक बारचा मालक संदीप सांगळे, हॉटेल कर्मचारी नितेश शेवाणी आणि जयेश बोणकर हे 6 आरोपी अटकेत आहेत. आज दुपारी अडीच वाजता या सर्वांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.. त्याआधी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांना पुन्हा चौकशीसाठी नेण्यात येणार आहेत. याशिवाय मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल आणि ड्रायव्हरचीही आज पुन्हा चौकशी होणार आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link