ठाणे : कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाट परिसरात बरसणाऱ्या सततच्या पावसाने येथील महामार्ग खचला आहे. गेले १० दिवस करंजाळे गावात जाणारी एसटी वाहतूक सेवा बंद होती. अखेर आजपासून एसटी वाहतूक सुरु करण्यात आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेले १० दिवस खासगी वाहन धारक प्रवाशांची लूट करत होते. त्यामुळे प्रवासी त्रस्त होते. अखेर प्रवाशांचे होणार हाल थांबणार आहेत. आजपासून पुन्हा एकदा या ठिकाणची एसटी सेवा सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांचे होणारे हाल थांबणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.