मुंबई -  राज्यातील राजकीय वातावरण ढवळून  काढणाऱ्या मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. महाराष्ट्र एटीएसच्या डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसुख हिरेन यांच्या  हत्येचा छडा लागला आहे. अशी माहिती शिवदीप लांडे यांनी  दिली आहे. रमेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आपल्या करिअरमधील सर्वांत कठीण केस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.