औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पर्यटनासाठी आलेल्या बांगलादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन आणि त्यांच्या मुलीला शनिवारी औरंगाबादमध्ये  प्रवेश नाकारण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 वेरुळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या या लेखिकेला एमआयएमने विरोध दर्शविल्यामूळे माघारी परतावं लागलं. 


पोलिसांनी केलेल्या विनंती नुसार तसलीमा या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईकडे रवाना झाल्या. दरम्यान विरोध करणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाच्या गेटवर गोंधळ घातला.