नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतलाय. हे सरकार जनसेवेसाठी नव्हे तर डल्ला मारण्यासाठी सत्तेत असल्याची टीका त्यांनी केली. मंत्र्यांच्या तोंडूनच या सरकारचं सत्य बाहेर पडत असल्याचा आरोप त्यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत असताना त्यांनी ठाकूरांवरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. 


महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी आताच आम्ही मंत्री झालो आहोत, आमचे खिसे अजून गरम झालेले नाहीत, विरोधकांचे खिसे गरम आहेत, म्हणून पैसे कुणाचेही घ्या, पण मतदान आम्हालाच करा, असं वक्तव्य वाशिममध्ये जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत केलं होतं, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे.