मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत राज्य सरकारला इशारा दिला. 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर 3 मेनंतर सर्व मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा निर्वाणीचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर ताशेरे ओढले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर राज ठाकरे यांनी खोचक शब्दात टीका केली. 'जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा नागाने फणा काढावा असा आहे, आता उद्या म्हणेल डसू शकतो वैगरे, ये, शेपूच धरून गरगर फिरवितो आणि फेकून देतो' अशा शेलक्या शब्दात राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. 


जितेंद्र आव्हाड म्हणत होते, इथल्या कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला तरी मी सन्यास घेईन, अरे सापडेल कसा? दाढी करतच नाहीत, याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली. याचवेळी राज ठाकरे यांनी मुंब्र्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची यादीच वाचून दाखवली.


जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर 
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मंत्रि जितेंद्र आव्हाड यांनीही उत्तर दिलं आहे. माझा चेहरा हा नागाच्या फण्यासारखा आहे असं म्हणता तर तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा आहे, अशा शब्दात आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. अशा वैयक्तिक कोट्या कोणीही करेल, ते मिमिक्री आर्टीस्टची जागा खाली आहे, अशी बोचरी टीकाही आव्हाड यांनी केली. 



यांनी कधी बहुजन समाजाचा इतिहास वाचलाच नाही. हे नेहमी पुरंदरेंचा इतिहास वाचत गेले, ज्या पुरंदरेंनी जेम्स लेनला माहिती देऊन आमच्या जिजाऊंची बदनामी केली ते ह्यांचे आदर्श असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.