मुंबई : मुंबईतील कॉंग्रेस कमेटीचे महासचिव विश्वबंधु राय यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना (Sonia Gandhi)पत्र लिहून राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल तक्रार केलीय. त्यामुळे महाविकास आघाडीत सार काही अलबेल नसल्याची चर्चा आहे.


कॉंग्रेसविरोधात कट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस हा जाणिवपूर्वक, रणनिती बनवून कॉंग्रेसला नुकसान पोहोचवतोय. ते आपल्या पक्षाला पुढे नेण्याच्या मागे लागलेयत असे विश्वबंधु राय यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. 



२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिल्या गेलेल्या आश्वासनांवर काम होत नाहीय. पार्टीमधील पदाधिकाऱ्यांच्या गळतीवर ठोस पावलं उचलायला हवीत असे देखील त्यांनी या पत्रात पुढे म्हटलंय.


वोट बॅंक जातेय


महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय. यामध्ये कॉंग्रेस पार्टी ही केवळ सहयोगी पक्ष म्हणून काम करतेय. एनसीपी आणि शिवसेना हेच सरकार चालवण्याच्या भूमिकेत आहेत. एनसीपी कॉंग्रेसचे महत्व कमी करतेय. शिवसेना आणि एनसीपी कॉंग्रेसची वोट बॅंक आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय.