COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर : नागपुरातील क्रेझी कॅसल वॉटरपार्क तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत. क्रेझी कॅसल व्यवस्थापनाने दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे तेथिल व्हेव पुलमध्ये अक्षय बिंड आणि सागर सहस्त्रबुद्धे या तरुणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलीस या घटनेची संपूर्ण चौकशी करीत आहेत.


रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली होती. उन्हाळ्याच्या सुट्या त्यातच रविवार असल्याने क्रेझी कॅसल वॉटरपार्कमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली होती.


कृत्रिम लाटा करणा-या पुलमध्ये खूप गर्दी होती तिथेच अक्षय बिंड आणि सागर सहस्रबुद्धे या तरुणांचा बुडून मृत्यू झाला.