दिपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नाणार वादाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास शिवसेना विरोध करण्याची चिन्हं सध्या दिसत आहेत. मुख्यमंत्री नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणण्याची घोषणा करणार असतील तर आम्ही पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी पुढाकार घेऊ अशी भूमिका शिवसेना उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. भाजप आमदार आशीष देशमुख यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. आशीष देशमुख यांनी चांगला अभ्यासपूर्ण प्रस्ताव दिला असून मला  त्यांचं कौतुक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

प्रकल्पाची विदर्भाला गरज 


नाणार राहणार नाही जाणार हे आता नक्की झालयं याचा पुनरुल्लेख उद्धव यांनी आज केला. प्रकल्प गुजरातला जाण्याची भीती दाखवली जात होती. कोकण नाही तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा प्रकल्प जावा... एकसारखी गुजरातची भीती दाखवू नये असे उद्धव यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे 1 लाख रोजगार निर्माण होणार असल्यान विदर्भाला त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे पण प्रकल्पापेक्षा काही केंद्र विदर्भात नेली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. देसाईंनी जो निर्णय घेतला तो अभ्यासपूर्ण होता. कायदे हे जनतेसाठी आहेत जनता कायद्यासाठी नाही आणि आम्ही जनतेसोबत आहोत. त्यामुळे प्रकल्प काही होत नाही.आम्ही तो घालवलाय असा विश्वास उद्धव यांनी जनतेला दिला आहे.

पोकळ अधिवेशन नको 


नुसतं विदर्भात पोकळ अधिवेशन घेण्यात काही होणार नाही. जसा विदर्भातील शेतकऱ्यांच्या जमीनी बाबत घेतला तसे काही चांगले निर्णय मुंबईत बसूनही घेतले जाऊ शकतात असा टोलाही उद्धव यांनी लगावला.