Kalicharan Maharaj : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी अटक झालेले कालीचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल (Mahatma Gandhi) केलेल्या वक्तव्यामुळे कालीचरण महाराज यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कालीचरण महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 10 वर्षांनंतर तुम्हाला मुस्लिम (muslim) व्हावं लागणार आहे, असे कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे शौर्य यात्रेचा आयोजन करण्यात आलं होते. त्यावेळी कालीचरण महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आपण 60 टक्क्यांच्या वर मतदानाला जात नाही. तुमचं काही खरं नाही. 10 वर्षांनंतर तुम्हाला मुस्लिम व्हावं लागणार आहे. बुरख्यात राहायचं आणि नवऱ्याने तीन तलाख म्हटलं की फेकून द्यायचं. तुम्ही आता तयारच राहा. तुमच्यात दम आहे पण मानसिक स्थिती नाही. एका खोलीत 25 लोक राहू शकतात. पण आपल्या एका बारक्या मुलाला वेगळी खोली लागते. मुस्लिमांचे आणि आपल्या राहणीमानात जमीन आस्मानाचा फरक आहे. आपण त्यांची बरोबरी करु शकत नाही. आठ आठ दिवस ते अंगच धूत नाही आणि आपल्याला टाकी लागते. देशात 140 कोटी लोकसंख्या आहे. त्यातील 94 कोटी हिंदू तर 46 कोटी मुस्लिम आहेत. येणाऱ्या 10 वर्षात त्यांचा पंतप्रधान होईल आणि शरिया कायदा लागू होईल," असे विधान कालीचरण महाराज यांनी केले आहे.


धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही


"आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यानेच आपण त्यांची पूजा करतो. हिंदू धर्मातील देव-देवता हिंसक आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंदसिंग महाराज, राणा प्रतापसिंह महाराज यांनी मारामाऱ्या केल्या म्हणून तर आपण त्यांना पूजतो. हिंदू धर्मातील देव देवतांनी आपल्यासाठी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पूजले असते का?" असा सवाल करत आपले सगळे देवी-देवता हिंसक आहेत. उद्देश देश, धर्मासाठी असेल तर खून करणे काही वाईट नाही, असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे.


श्रद्धा वालकर प्रकरणातही धक्कादायक वक्तव्य


श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाबाबतही कालीचरण महाराज यांनी केलेल्या विधान चर्चेत आले होते. या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू धर्माच्या वतीने लव्ह जिहाद कायदा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये कालीचरण महाराज सहभागी झाले होते. त्यावेळी, "डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि मुलीला प्यायला द्या मग डोकं ठिकाण्यावर येईल, सर्व भूत प्रेम तंत्र मंत्र बाहेर येईल," असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले होते.